Sunday, December 14, 2014

मंथन

मंथन म्हंटले कि आठवते ते 'समुद्र मंथन', जे देवांनी आणि असुरांनी 'अमृत' मिळवण्यासाठी केले होते. ह्या गोष्टीचा आपण जरा आपल्या जीवनाशी संबंध लावू या. जेव्हा आपण दुखी असतो, मन अशांत असतं, तेव्हा आपल्याला जाणवत कि आपल्या मनात खूप काही उथल पुथल चालू आहे. हि उथल पुथल असते ती सुखाच्या क्षणांची आणि दुखाच्या क्षणांची झालेली घालमेल. ह्या घालमेलीतून बरेच अमुल्य रत्न बाहेर पडत असतात जे आपल्याला कधी कळतात तर कधी कळत नाहीत. आता हि रत्ने कळली तर माणूस वळतो नाही तर दुखात गळतो. सांगायचे तात्पर्य असे कि, कोणते हि रत्न प्राप्ती साठी दुखाची आणि सुखाची सांगड असणे आवश्यक असते, नाही तर मंथन शक्यच होत नाही.

हे रत्न ओळखणे हि त्या व्यक्ती वर अवलंबून आहे, तिच्या विचारसरणी वर अवलंबून आहे. आपण स्वतःला किती प्रश्न विचारतो? कधी आपण स्वतःला विचारतो: आपण कोण आहोत? कशासाठी ह्या भूतलावर आलोत? आपला इथे काम काय आहे? फक्त पैसे कमावणं आणि संसार थाटण? आपण दुखासाठी नेहमी नशिबाला दोष देतो. वेग वेगळे उपाय करतो, जेणेकरून दुख आपल्या पोटी नको यायला. आपण सगळीकडे फिरतो, कोणा कोणाचे पाय धरतो, पण कधी आपल्या आत बघत नाही. म्हणून आपल्याला हि रत्ने मिळत नाहीत आणि आपण नेहमी दुखीच राहतो.

No comments:

Post a Comment